बेंगळुरू : बालकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया घालणाऱ्या अंगणवाड्या या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक मानल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात अंगणवाडीतूनच होत असल्याने त्यांच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते. मात्र, समाजाच्या या महत्त्वाच्या जबाबदारीचे वहन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »गृहलक्ष्मी योजनेवर सरकारचा ‘बायोमेट्रिक’ फास; मृत व अपात्र लाभार्थ्यांचा शोध सुरू
बेंगळुरू : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पाच हमी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने आता बायोमेट्रिक पडताळणीचे हत्यार उपसले आहे. योजनेचा लाभ खऱ्या आणि पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा, यासाठी महिला व बालविकास विभागाने राज्यभर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये मृत …
Read More »अर्धवट कामासह विकास कामांच्या मागणीचे राजेंद्र वडर यांचे मंत्री जारकीहोळी यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या नूतन मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून फेरनिवड झाल्यानंतर सतीश जारकीहोळी यांची भोज जिल्हा पंचायतचे माजी सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वडर पवार यांनी भेट घेतली. यावेळी निपाणी तालुक्यातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे निवेदन वडर यांनी जारकीहोळी यांना दिले. यमकनमर्डी येथील मंत्री …
Read More »महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेच्या संस्थेच्या हुन्नरगी शाखा अध्यक्षपदी वसंत शिंत्रे, उपाध्यक्षपदी अशोक मुरदंडे यांची निवड
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या हुन्नरगी शाखा अध्यक्षपदी वसंत शिंत्रे तर उपाध्यक्षपदी अशोक मुरदंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे सहकार रत्न संस्थापक चेअरमन डॉ. सी. बी. कुरबेटी सर व संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर …
Read More »डिगेगाळी – जटगे परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार
खानापूर : ऐन पेरणीच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याने डिगेगाळी–जटगे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जटगे येथील शेतकरी राजाराम रामचंद्र पाटील यांचा बैल वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम पाटील हे आपल्या बैलासह डिगेगाळी परिसरातील शिवारात …
Read More »अक्कोळ मराठी मुलींच्या शाळेत चव्हाण परिवारातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील मराठी मुलींच्या शाळेत निपाणीतील उद्योजक किशोर आणि स्नेहा चव्हाण परिवारातर्फे १२० विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात. याशिवाय मराठा मंडळ गर्ल्स हायस्कूल मधील विद्यार्थिनींना ३० पॅड आणि कंपासाचे वितरण करण्यात आले. गेल्या दहा वर्षापासून चव्हाण परिवारातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना …
Read More »घनदाट जंगलात वाट चुकलेल्या वृद्धाला वनविभागाचे जीवदान; रात्रभर चाललेल्या शोधमोहीमेला यश
खानापूर : घनदाट जंगलात गुरे चारताना वाट चुकून बेपत्ता झालेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा वनविभागाने तब्बल दहा तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर सुखरूप शोध लावला. वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या भीमगडच्या जंगलात रात्रभर सुरू असलेल्या या धाडसी मोहिमेमुळे एका वृद्धाचे प्राण वाचले असून वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. खानापूर तालुक्यातील …
Read More »हब्बनहट्टी खनिज वाहतूक प्रकरण तापले; विविध विभागांच्या भूमिकेवर संशय, चौकशीची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी परिसरात सुरू असलेल्या खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणाने नवे वळण घेतले असून, ओव्हरलोड वाहनांची वाहतूक, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि संबंधित शासकीय विभागांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही …
Read More »बनावट गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; एक जण अटकेत, दोघांचा शोध सुरू
बंगळूर : दहावी (एसएसएलसी), बारावी (पीयूसी) आणि पदवी अभ्यासक्रमांच्या बनावट गुणपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात राजा रेड्डी नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून फरार असलेल्या आणखी दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरमंगल परिसरात …
Read More »कर्नाटकातून राज्यसभेवर चारही उमेदवार बिनविरोध विधानसभा सचिवांची अधिकृत घोषणा
बंगळूर : कर्नाटक विधानसभेतून १८ जून रोजी होणारी राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडली असून काँग्रेसचे तीन आणि भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार राज्यसभेसाठी निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर उरलेल्या चारही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी तथा विधानसभा सचिव एम. के. विशालाक्षी यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta