बेळगाव : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला बेळगाव जिल्ह्यात वेग आला असून, सर्व १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांना अर्ज वाटपाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. जिल्ह्यातील ४१.०७ लाख मतदारांपर्यंत अर्ज पोहोचविण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, प्रत्येक मतदाराने मतदार यादीतील आपले नाव, पत्ता …
Read More »८ ऑगस्टची अंतिम मुदत जवळ; एसआयआर मोहिमेला वेग, बीएलओंची घराघरांत धावपळ
बेळगाव : मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेची ८ ऑगस्ट ही अंतिम मुदत जवळ येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कामाला अधिक गती दिली आहे. ३० जूनपासून सुरू असलेली ही मोहीम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) युद्धपातळीवर घराघरांत जाऊन अर्ज संकलन आणि ऑनलाइन नोंदणीचे काम करत आहेत. आतापर्यंत बेळगाव …
Read More »आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामाला प्रारंभ न केल्यास कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे रस्त्यावरची लढाई
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील श्री हालसिध्दनाथ देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाची निर्मिती करावी, तालुका पंचायत कार्यालयातील शेतकऱ्यांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कामे त्वरित करण्याचे आश्वासन पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष …
Read More »महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; कृष्णा-वेदगंगा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका
चिकोडी : महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कल्लोळजवळ कृष्णा नदीत सध्या सुमारे ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीच्या पाणीपातळीत …
Read More »बोरगाव अरिहंत को-ऑप. बँकेच्या बेनाडी शाखेचा दहावा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंतको-ऑप. क्रेडिट सो.लि., बोरगाव (मल्टिस्टेट) संस्थेच्या येथील शाखेचा दहावा वर्धापन दिन पार पडला. त्यानिमित्त श्री महासरस्वती व महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम झाला. अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाररत्न उत्तमपाटील. यांच्या प्रमुख उपस्थित पूजन करण्यात आले. संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते …
Read More »सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान
दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त बुधवारी (दि. २२ जुलै) मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान झाले. विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या दिंडीमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रस्थानापूर्वी वाहनाचे विधिवत पूजन तानाजी कळवीकट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या …
Read More »आषाढीसाठी वारकऱ्यांना दिलासा! बेळगावमार्गे पंढरपूर विशेष रेल्वे; सहा फेऱ्यांचे नियोजन
बेळगाव : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. धारवाड–पंढरपूर–धारवाड या मार्गावर 23 ते 28 जुलै दरम्यान विशेष रेल्वे धावणार असून, बेळगावसह सीमाभागातील हजारो भाविकांचा विठुरायाच्या दर्शनाचा प्रवास यामुळे अधिक सुलभ होणार आहे. दरवर्षी बेळगाव, खानापूर, हुबळी, धारवाड आणि परिसरातील हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी …
Read More »भारतनगर पंच कमिटीची निवड; महादेव तुकाराम पाटील सरपंचपदी
बेळगाव : भारतनगर पहिली गल्ली, शहापूर येथील पंच कमिटीची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये गल्लीतील ज्येष्ठत्वानुसार ज्येष्ठ नागरिक श्री. महादेव तुकाराम पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. तसेच सेक्रेटरीपदी श्री. विजय वांगणेकर, तर खजिनदारपदी श्री. प्रभाकर मारुती अष्टेकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. संतोष नारायण कणुकले, …
Read More »पेपरफुटीच्या मुद्द्यावर मोदी सरकारची कोंडी; संसदेपासून पंतप्रधान निवासापर्यंत विरोधकांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस लाठीमार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरील राजकीय दबाव अधिकच तीव्र होताना दिसत आहे. संसदेत सातत्याने गदारोळ, चर्चेची विरोधकांची मागणी आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने काढलेले आंदोलन यामुळे राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले. संसदेत पेपरफुटी …
Read More »कृषी तलावात पडून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कक्केरी परिसरात हळहळ
कक्केरी : कक्केरी येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा मंगळवारी सकाळी शेतातील कृषी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मल्लय्या हिरेमठ हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. शेतातील कृषी तलावाजवळ वाढलेले गवत व कचरा साफ करत असताना त्यांचा पाय घसरून ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta