Monday , May 25 2026
Breaking News

निपाणी

नव्याने बांधलेले स्मशान शेड वापराविना पडून; नगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊनही दुर्लक्ष

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका प्रशासनातर्फे अनेक वर्षांपूर्वी शहराच्या पूर्वेला असलेल्या स्मशान मारुती मंदिराशेजारी स्मशान शेडची निर्मिती करण्यात आली होती. वारंवार हे शेड खराब होत असल्याने पावसाळ्यात मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेने या परिसरातच नव्याने स्मशान शेड उभारले आहे. पण ते वापराविना …

Read More »

धर्मवीर संभाजीराजे चौकात संभाजीराजे जयंती कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री संभाजी राजे चौकात गुरुवारी (ता.१४) छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर पुष्पहार चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी अर्पण केला तर श्रीफळ राजेश कदम यांनी …

Read More »

चाऱ्याच्या टंचाईवर मुरघासचा पर्याय

  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण; दूध उत्पादनात होते वाढ निपाणी (वार्ता) : ऐन उन्हाळ्यात जनावरांच्याखाद्याच्या वाढत्या दरांमुळे निपाणी भागातील पशुपालक शेतकरी आता पर्याय म्हणून मुरघासाकडे वळत आहेत. जनावरांना सकस खाद्य मिळून दुग्धोत्पादन वाढण्यास मुरघास उपयुक्त ठरत असल्याने वर्षभर चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी शेतकरी उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण …

Read More »

शिवाजीनगरमधील पाण्याचा दाब वाढविण्यासाठी नागरिकांचे नगरपालिका आयुक्तांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात २४ तास पाणी योजना कार्यान्वित होऊनही शिवाजीनगर सहाव्या गल्ली परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत बऱ्याचदा पाणीपुरवठा विभागाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे अखेर अंबाबाई मंदिर परिसरातील कुटुंबीयांनी बुधवारी (ता.१३) नगरपालिका …

Read More »

युवकांनी मैदानी खेळांचे जतन करावे : सहकाररत्न उत्तम पाटील

  अरिहंत चषक हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात मोबाईल आणि दूरचित्रवाणीमुळे मैदानी खेळांकडे युवकांनी पाठ फिरवली आहे. पारंपरिक खेळांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अरिहंत उद्योग समूहाने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले असून क्रिकेट, कुस्ती, कबड्डी आणि व्हॉली-बॉलसारख्या स्पर्धांना मोठ्या बक्षिसांच्या माध्यमातून पाठबळ दिले आहे. भविष्यातही …

Read More »

जवाहर तलावातील गाळ काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती वाढविणे आवश्यक : प्रा. राजन चिकोडे यांची मागणी

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची तहान भागवणारी जीवनदाहिनी असलेल्या ‘जवाहरलाल नेहरू वॉटर वर्क्स’ या ऐतिहासिक जलाशयाला यंदा ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून जलाशयातील साचलेला गाळ काढून या ‘गंगेला’ मोकळा श्वास घेऊ द्यावा. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे असे पत्रक माजी सभापती प्रा. राजन …

Read More »

बोरगाव येथे गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदू महासंमेलनाचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सकल हिंदू समाज बोरगाव यांच्यातर्फे गुरुवारी (ता.१४) बोरगाव येथे हिंदू संमेलन होणार आहे. भारत देश हा हिंदू राष्ट्र असून याच देशात हिंदू जनजागृतीसाठी प्रयत्न करीत असल्याचे लाजिरवाणी गोष्ट आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती …

Read More »

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून जिद्दीने पूर्ण करावीत

  प्रकाश भागाजे; जिनलक्ष्मी संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञानावर समाधान मानू नये. तर व्यवहारज्ञान, सकारात्मक विचार आणि ध्येयपूर्तीसाठीची जिद्दीने अभ्यास करणे आवश्यक आहे. दहावीचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वळणबिंदू असून या काळात घेतलेले योग्य निर्णय आणि मेहनत भविष्यातील यशाची दिशा ठरवते, …

Read More »

‘अधिक मासा’च्या धास्तीने लगीनघाई

  नियोजनानुसार विवाह मुहूर्ताची लगबग; बाजारपेठेतील उलाढाल वाढली निपाणी (वार्ता) : तब्बल तीन वर्षांनंतर येत असलेल्या ‘अधिक मासामुळे यावर्षी लग्नसराईच्या नियोजनाची धावपळ उडाली आहे. येत्या रविवार (१७) पासून अधिक मासाला सुरवात होत आहे. त्यानंतर पुढील काळात विवाहासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध नाहीत. त्यामुळे १७ मे पूर्वीचे मर्यादित मुहूर्त गाठण्यासाठी वधू-वर पित्यांची …

Read More »

बोरगाव येथील शांतीसागर सोसायटीला मार्चअखेर ४ लाख ८२ हजार रुपयांचा नफा

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील आचार्य श्री १०८ शांतीसागर को-ऑप सोसायटीला मार्च २०२६ अखेर ४ लाख ८२ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, हालशुगरचे संचालक शरद जंगटे यांनी दिली. संस्थेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जंगटे म्हणाले, संस्थेने पारदर्शक व शिस्तबद्ध कारभार करत ठेवीदारांचा विश्वास संपादन …

Read More »