बेळगाव : दिल्लीतील जंतरमंतर येथे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच नीट परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ बेळगावातील छत्रपती संभाजी चौकात विविध सामाजिक संघटनांनी बुधवारी निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी लडाखमधील प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे, तसेच उपोषणाकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी केली. …
Read More »रस्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास
खासदार प्रियांका जारकिहोळी; निपाणीत रस्ता कामाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघाचा रस्त्याच्या माध्यमातून विकास साधला जाईल. आवश्यक त्या गावातील प्रमुख मार्गावरील प्रमुख आणि संपर्क रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्वच रस्ते दर्जेदार करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले.जत्राट वेस येथील …
Read More »दोन वर्षांपासून बंद असलेला टेकाकडील चव्हाटा मंदिर शेतवडीचा रस्ता अखेर खुला
मध्यस्थी पंचांच्या यशस्वी प्रयत्नांना यश; शेतकरी वर्गात समाधान कुद्रेमानी : कुद्रेमानी येथील टेकाकडील चव्हाटा मंदिराकडे जाणारा शेतवडीतील रस्ता गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांमधील वादामुळे बंद होता. अखेर दि. १२ जुलै २०२६ रोजी मध्यस्थी पंचांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे हा वाद मिटला आणि बंद पडलेला रस्ता पुन्हा खुला करण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी …
Read More »सरकारी मराठी शाळेस कायमस्वरूपी मुख्याध्यापक देण्याची एसडीएमसीची मागणी
मच्छे : सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील एस डी एम सी सदस्यांनी आज गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट देऊन शाळेसाठी कायमस्वरूपी मुख्याध्यापक नियुक्त करावा तसेच शाळेतील इतर प्रलंबित अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले. यावेळी शाळेतील वाढती विद्यार्थीसंख्या, नव्याने सुरू झालेले LKG-UKG वर्ग तसेच …
Read More »नो बॅग डे’मध्ये अमली पदार्थांविरोधी जनजागृती; तिसऱ्या शनिवारी शाळांमध्ये विशेष उपक्रम
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या दप्तराचा भार कमी करण्याबरोबरच सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ‘नो बॅग डे’ उपक्रम राबविण्यात येतो. जुलै महिन्यातील या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शनिवार, १८ जुलै रोजी होणाऱ्या ‘नो बॅग …
Read More »मतदार संघातील समस्यासाठी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय
खासदार प्रियांका जारकीहोळी; मतदार संघ काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील नागरिकांसाठी येथे काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मतदारांनी आपल्या कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. या ठिकाणी संगणक आणि ऑपरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. एस आय आर नोंदणी करून आपला मतदानाचा अधिकार …
Read More »क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूंच्यात शिस्त, जिद्द व संघ भावना निर्माण होते : रोहिणी पाटील
विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा बेळगाव : क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूमध्ये शिस्त, जिद्द, आणि संघ भावना निर्माण होते. बेळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रीडाक्षेत्राचा फायदा घेऊन राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे नाव उज्वल करावे व खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रासाठी कठोर मेहनत व सातत्य ठेवण्याचे आव्हान एकलव्य पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय …
Read More »जवाहरलाल नेहरू तलावातील गाळ काढण्यासंदर्भात विविध प्रस्तावांसह नगरपालिकेला निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची जीवनदायिनी असलेल्या जवाहरलाल नेहरू तलावातील साचलेला गाळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तातडीने काढून जलाशयाची पाणी साठवण क्षमता वाढवावी, अशी मागणी माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील माहिती अशी, येथील जवाहरलाल नेहरू तलावात अनेक वर्षांपासून गाळ …
Read More »पावसाने डोळे वठारल्याने स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी; वाढत्या उन्हामुळे सोयाबीन धोक्यात
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीनसह भाजीपाला आणि पिके धोक्यात आली आहेत. पावसाच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची लागवड केली. मात्र त्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने पिकाची वाढ खुंटत आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिके वाचवण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचा आधार घेतला आहे. …
Read More »शिवारात शेतकरी, दारात शिक्षक; एसआयआर मोहिमेला खरीप हंगामाचा फटका
बेळगाव : विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील शिक्षक-भूतस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामातील शेतीकामांमुळे बहुतांश शेतकरी दिवसभर शिवारात असल्याने “शिवारात शेतकरी, दारात शिक्षक” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, मतदारांच्या भेटीसाठी बीएलओंना वारंवार हेलपाटे मारावे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta