Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूर येथे म. ए. समितीविरोधात प्रशासनाला निवेदन

  खानापूर : २२ जून रोजी म. ए. समितीने आयोजित केलेल्या आंदोलनाला प्रशासनाने परवानगी देऊ नये, या मागणीसाठी स्थानिक संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या खानापूर तालुका घटकाच्या वतीने तहसीलदारांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. २२ जून रोजी होणाऱ्या आंदोलनामुळे सीमाभागातील कायदा व …

Read More »

पावसाळ्यापूर्वी होणार मांगुर फाट्यावरील पिल्लर उभारणी

  पश्चिमेकडून वाहतूकीचा मार्ग मोकळा : वेदगंगा नदीकाठ राहणार सुरक्षित निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. मांगुर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पुल हा सीमाभागातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या चिवट लढ्यामुळे भरावा ऐवजी पिलरचा होत आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाची साथ मिळाल्यास येत्या पावसाळ्यापूर्वी पश्चिमेकडील बाजूची …

Read More »

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योगा दिन उत्साहात साजरा

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रस्त्यावरील अंकुरम इंग्लिश मीडियम शाळेतील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा जागतिक योग दिन शनिवारी (ता.२०) पार पाडला. यावेळी संस्थेचे संचालक नारायण चौगुले, संचालिका नम्रता चौगुले, सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले, प्राचार्या चेतना चौगुले त्यांची प्रमुख उपस्थिती होती. नारायण चौगुले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व …

Read More »

बोरगाववाडी- कसनाळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारकासह, विद्यार्थी, शेतकऱ्यातून संताप

  निपाणी (वार्ता) : कोट्यावधी रुपये खर्चून पाच वर्षांपूर्वी खडीकरण, डांबरीकरणसह मजबुती झालेल्या बोरगाववाडी- कसनाळ रस्ता उध्वस्त होऊन खड्ड्यात गेला आहे. विस्कटलेल्या खडीमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकातून संताप व्यक्त केला जात आहे शेतकऱ्यांना प्रमुख असलेल्या या रस्त्याचे डांबरीकरण खडीकरण व मजबुतीकरण साठी साडेतीन किलोमीटरच्या …

Read More »

पिण्यासह शेती पाण्यासाठी नदीत पाणी सोडा

  कर्नाटक राज्य रयत संघटनेची मागणी : तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन निपाणी (वार्ता) : जून महिना संपत आला तरीही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणी सापडले आहेत. सोयाबीनचे इतर पिके वाळत असून नदीपासून पाणी योजना राबवलेल्या गावातही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने वेदगंगा आणि दूधगंगा नदीत पाणी सोडून …

Read More »

काटगाळीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला; महिला व बालविकास विभागाची तात्काळ कारवाई

  खानापूर : खानापूर तालुक्यातील काटगाळी गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याची तयारी सुरू असताना महिला व बालविकास विभागाने वेळेवर हस्तक्षेप करत बालविवाह रोखण्यात यश मिळवले. स्पंदना स्वयं-सहाय्यता समूहाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहिती मिळताच महिला व बालविकास विभागाचे सीडीपीओ विक्रम यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. …

Read More »

राज्यात ‘नो बॅग डे’ उपक्रम सुरूच; तिसऱ्या शनिवारी पुस्तके नव्हे, अनुभवातून शिक्षण

  बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वाढते ओझे कमी व्हावे, शिक्षण अधिक आनंददायी व अनुभवाधारित व्हावे तसेच विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि सामाजिक जाणीवा विकसित व्हाव्यात या उद्देशाने शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने यंदाही ‘नो बॅग डे’ उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी …

Read More »

व्यसनामुळे कुटुंबासह समाजाचे नुकसान

  कुर्ली हायस्कूलमध्ये प्रबोधनपर व्याख्यान निपाणी (वार्ता) : मादक पदार्थांचे सेवन हे केवळ व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचेही नुकसान करणारे आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य, गांजा, अमली पदार्थासारख्या व्यसनांमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. सध्या व्यसनमुक्त युवक हीच सक्षम समाजाची ताकद असल्याचे मत निपाणी ग्रामीण पोलीस …

Read More »

राज्यातील वीज खाजगीकरण प्रक्रिया रद्द करा; ‘रयत’तर्फे तहसीलदारांना निवेदन

अन्यथा राजू पोवार यांचा आंदोलनाचा इशारा निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने राज्यातील वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. वीज ही सर्वसामान्य माणसाची मूलभूत गरज असू तिचे नियंत्रण खाजगी कंपन्यांना देणे हे जनहिताच्या विरोधात आहे. त्यामुळे …

Read More »

अर्धा जून न उलटला तरीही शेतकऱ्यांचे डोळे वरूनराजाकडे

  मृग नक्षत्र कोरडे गेल्याने हंगाम वाया जाण्याची भीती निपाणी (वार्ता) : मृगातील पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होते. मात्र यंदा मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला तरी पेरणी योग्य पाऊस न पडल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची टोकनी केली आहे. पण त्यानंतर …

Read More »