Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

मुसळधार पावसाचा इशारा; बेळगावसह सात जिल्ह्यांना रेड अलर्ट

  बेळगाव : राज्यात मान्सूनचा जोर कायम असून, किनारपट्टी आणि मलेनाडू भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) बेळगावसह उडुपी, दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड, शिवमोग्गा, चिक्कमंगळूर आणि कोडगू या सात जिल्ह्यांसाठी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी २०४.४ मिमीपेक्षा अधिक पावसाची …

Read More »

शेतकरी कर्जमाफीचा सर्वंकष आढावा घेऊन निर्णय

  मुख्यमंत्री शिवकुमार; दुष्काळी परिस्थितीची पाहणी करूनच घोषणा बंगळूर : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा सर्वंकष आढावा घेऊन त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. तसेच दुष्काळी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेतल्यानंतरच संबंधित भागांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गुलबर्गा विभागातील जिल्ह्यांच्या प्रगती आढावा …

Read More »

डिजिटल क्रांतीमुळे वाचनाकडे दुर्लक्ष; नामदेवराव चौगुले

  कुर्लीत ‘वाचन कट्टा’ उपक्रमाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : डिजिटल क्रांतीमुळे वाचनाकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि ज्ञानाची आवड निर्माण करून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी वाचन गरजेचे असल्याचे मत निपाणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले यांनी व्यक्त केले. एचजेसी चीफ फौंडेशन व …

Read More »

अल्पवयीन दुचाकीस्वाराला निपाणी पोलीसाकडून २५ हजार रूपयांचा दंड

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात कार्यान्वित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन’ (एएनपीआर) कॅमेऱ्यांनी पहिल्याच मोठ्या कारवाईत आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे. मुरगूड रोडवरील ए.आय कॅमेऱ्यात एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत असल्याचे स्पष्टपणे कैद झाले. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

खानापूरात विजेचा लपंडाव कायम; विकासकामांवरही प्रश्नचिन्ह

  ‘जनता त्रस्त… लोकप्रतिनिधी मस्त’ म्हणत काँग्रेसची सत्ताधाऱ्यांवर टीका खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. वीजपुरवठा, रखडलेली विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि सिंचन प्रकल्पांचा रखडलेला प्रश्न …

Read More »

पावसाचा पुन्हा जोर; १० जुलैपर्यंत मुसळधार सरींचा इशारा

  बेळगावसह चार जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे सावट; पूर, भूस्खलन आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता बेळगाव : रविवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार हजेरी लावत संततधार सुरू केली आहे. त्यामुळे जनजीवनावर पुन्हा पावसाचे सावट गडद झाले असून १० जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान …

Read More »

मतदारांची नावे कायम राहण्यासाठी योग्य माहिती द्यावी

  चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचे आवाहन निपाणी (वार्ता) : भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी दुरुस्तीचे (एस आय आर) काम सुरू आहे. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहावीत, या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. माहिती घेण्यासाठी आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी, असे आवाहन बुडा अध्यक्ष …

Read More »

निपाणी ‘जवाहर’ तलावाची पाणी पातळी ३२.२ फुटावर

  आठवडाभरात ११ इंचानी वाढ: शिरगुप्पी ओढ्यातून तलावात पाणी निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे निपाणीची जीवनदायिनी असणाऱ्या जवाहर तलावाच्या पाणी पातळीत ११ इंचानी वाढ झाली आहे. पावसापूर्वी ३० फुट असलेली पाणी पातळी सोमवारी (ता.६) ३२.३ फुट इतकी झाली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात मान्सून असाच …

Read More »

संततधार पावसाचा कहर; हब्बनहट्टीचे मारुती मंदिर पाण्याखाली

  खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील मलप्रभा नदीसह म्हादई, मंगोत्री, काळी, पांढरी आणि मार्कंडेय नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त …

Read More »

बोरगाव इंदिरा कॅन्टीनचे काम पूर्ण होऊनही उद्घाटनाअभावी नागरिकांमध्ये नाराजी

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारतर्फे बोरगाव येथे उभारण्यात आलेल्या इंदिरा कॅन्टीनचे काम पूर्ण होऊनही अद्याप कॅन्टीन सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून उद्घाटनाच्या श्रेयवादामुळेच कॅन्टीनच्या प्रारंभाला विलंब होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुमारे ८५ लाख खर्च करून इंदिरा कॅन्टीन उभारण्यात आले आहे. …

Read More »