Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावचा बी.फार्म प्रथम सत्राचा निकाल जाहीर

  बेळगाव : राजीव गांधी युनिव्हर्सिटी आँफ हेल्थ सायन्स, बेंगलोर या विद्यापिठातर्फे घेण्यात आलेल्या बी.फार्म (प्रथम सत्र) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील बगेइरम मुल्ला यांनी 84.5% गुणांसह प्रथम क्रमांक, उम्मेहानी ओलमनी यांनी 82.7% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर मुबीना डबाडी यांनी 81.8% गुणांसह …

Read More »

मेजर प्रा. डॉ. अशोक डोनर यांची देवचंद कॉलेजच्या उपप्राचार्यपदी निवड

    निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक मेजर डॉ. अशोक डोनर यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवाकार्याचा हा यथोचित सन्मान मानला जात आहे. मेजर डॉ. डोनर यांनी गेली ३२ वर्षे देवचंद कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली …

Read More »

दहा लाख कि. मी. धावलेल्या भंगार बस रस्त्यावर

  प्रदूषणासह प्रवाशांचा जीव टांगणीला निपाणी (वार्ता) : ‘कमी खर्चात आगार चालवायचे आणि प्रशासनाकडून बक्षिसे मिळवायची’ या अधिकाऱ्यांच्या खटाटोपामुळे निपाणी आगारातील बसची अवस्था नाजूक झाली आहे. नियमानुसार बसेस सुरळीत चालण्यासाठी दहा लाख किलोमीटर रनिंगची मर्यादा असताना या आगारात त्यापेक्षा अधिक किलोमीटर धावलेल्या बस अद्यापही प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. या भंगार …

Read More »

डी. के. शिवकुमार यांच्यासोबत बेळगावातून सतीश जारकीहोळी घेणार मंत्री पदाची शपथ

  बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झालेल्या नव्या सरकारच्या स्थापनेला बुधवारी सायंकाळी औपचारिक सुरुवात होत असून, नव्या मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात १४ जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली असून, बेळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते सतीश …

Read More »

नामफलकांवरील ६०-४० नियमासाठी जिल्हा प्रशासनाला मध्यवर्ती म. ए. समितीकडून निर्वाणीचा इशारा

  बेळगाव : सरकारी व खासगी आस्थापनांच्या नामफलकांवर ६० टक्के कन्नड आणि ४० टक्के इतर भाषांचा नियम लागू करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाला २२ जूनपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत मागणी मान्य न झाल्यास मराठी भाषिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांनी दिला. …

Read More »

भातकांडे शाळेसमोरील रस्त्याने घेतला मोकळा श्वास; दुरुस्तीच्या कामास प्रारंभ

  बेळगाव : शहरातील भातकांडे स्कूल रस्ता दुरुस्तीच्या कामास अखेर बुधवारी प्रारंभ झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या या मार्गाला अखेर दिलासा मिळाल्याने व्यापारी, वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. भातकांडे शाळेसमोरील या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. व्यापारी व्यवहारांसाठी चारचाकी …

Read More »

मराठी शाळा कंग्राळी खुर्दच्या शताब्दी महोत्सवात 1981-88 बॅचची विक्रमी देणगी

  बेळगाव : मराठी शाळा, कंग्राळी खुर्द (ता. व जि. बेळगाव) शतक महोत्सवी सोहळ्याला माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३० व ३१ मे रोजी संपन्न झालेला हा सोहळा “न भूतो न भविष्यति” असा अविस्मरणीय ठरला. शाळेच्या 1981 ते 1988 या बॅचमधील सुमारे 53 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी …

Read More »

जलवाहिनी गळतीचा फटका; बेळगावच्या अनेक भागांचा पाणीपुरवठा ठप्प

  बेळगाव : राणी चन्नम्मा चौक परिसरातील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने शहरातील अनेक भागांचा बुधवारी (दि. ३) पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गळती दुरुस्तीसाठी तातडीने काम सुरू करण्यात आल्याने संबंधित भागांमध्ये नियोजित पाणीवाटप करता आले नाही. याची नोंद घेऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासन आणि एल अँड टी …

Read More »

कागवाडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

  कागवाड : कागवाड पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. पहिली घटना कागवाड-शेडबाळ मार्गावरील उप्पारवाडी गावाजवळ घडली. शेडबाळहून कागवाडकडे जात असलेल्या दुचाकीची समोरच्या दिशेने जात असलेल्या मारुती स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात महाराष्ट्रातील …

Read More »

श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीयांचे प्राण आहेत : डॉ. शेवडे

  बेळगाव : रामकथा ब्रम्हांड भेदून न्यावी, हे समर्थांचे म्हणणे शब्दशः सत्य ठरले आहे. आज जगातल्या बहुतेक प्रमुख भाषांमधून रामकथेचा अनुवाद झालेला आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीयांचे प्राण आहेत. रामकथा अनेकांनी रचली. वाल्मिकी हे रामांना समकालीन असल्यामुळे त्यांनी लिहिलेले रामायण हे अधिकृत असल्याचे मानले जाते. भारतातल्या बहुतेक प्रमुख भाषांमध्ये …

Read More »