Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

डॉक्टरांच्या घरातील कोट्यवधींच्या दागिन्यांची चोरी उघड; केअरटेकर अटकेत

  बेळगाव : बेळगावातील एका नामांकित डॉक्टरांच्या घरातून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून फरार झालेल्या केअरटेकरला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चोरीचा माल विक्रीसाठी मदत करणाऱ्या आणखी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल सतीश कांबळे (वय २७, मूळ रा. कागवाड) असे असून, …

Read More »

पत्रकारितेच्या निष्ठेला मानवंदना, दिवंगत पत्रकार विठ्ठलराव पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन

  संकेश्वर (प्रतिनिधी) : समाजातील अन्याय, समस्या आणि सामान्य जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या पत्रकारांचे कार्य हे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांइतकेच महान आणि जबाबदारीपूर्ण आहे, असे गौरवोद्गार प्रकाश आवलक्की यांनी काढले. येथील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत विठ्ठलराव बाळू पाटील यांच्या ७ व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत …

Read More »

हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरीच्या तपासासाठी निपाणी पोलीस प्रशासनाला नागरिकांचे निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यातील साखर चोरीप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपास जलद गतीने होण्यासाठी माजी आम. प्रा. सुभाष जोशी, संचालक सुकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांना निवेदन देण्यात आले. याविषयी माहिती देताना माजी आमदार प्रा. जोशी म्हणाले, श्री. हालसिध्दनाथ …

Read More »

पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला धमकी देणारा युवक गजाआड

  बेळगाव : पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात साक्ष देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिरनवाडी येथील एका युवकाला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित विठ्ठल गणाचारी (वय 20, रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी, बेळगाव) असे असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या …

Read More »

शत्रूंचे मनसुबे उधळण्यासाठी हिंदू समाज एकवटण्याची गरज

  श्रीराम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक; निपाणीत हिंदू एकता सभा निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नाव नसून एक प्रचंड विचारशक्ती आहेत. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य आणि कुटुंबाचे सुख पणाला लावले. स्वातंत्र्यानंतरच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सावरकरांना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा विचार हा काल, आज आणि …

Read More »

जमिनीच्या वादातून सहा जणांची गोळ्या झाडून हत्या; विजापूर जिल्ह्यात खळबळ

  विजापूर : जमिनीच्या जुन्या वादातून सहाजणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी घडली. भर दिवसा झालेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपूर गावातील निराळे आणि गोलगी कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून …

Read More »

जयनगर-हुंचेनहट्टी खूनप्रकरणी २४ तासांत पोलिसांची मोठी कारवाई; ५ आरोपी गजाआड

  बेळगाव : बेळगावजवळील हुंचेनहट्टी गावाच्या शिवारात सेकंड हँड कारच्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाले असून, या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ५ आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे. या घटनेत मजगाव येथील राहुल तळवार (वय २२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 16 जणांचा बळी

  पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे विषारु दारु प्यायल्याने आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेकजण गंभीर आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्यातील काळे पडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही …

Read More »

‘वन ग्रॅम’ सोन्याच्या दागिन्यांना निपाणीकरांची पसंती

  सोन्या चांदीच्या दरवाढीचा परिणाम; कमी खर्चात आकर्षक दागिने उपलब्ध निपाणी (वार्ता) : वर्षभरात सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याने मोठा आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे वन ग्रॅम सोन्याचे दागिने हा पर्याय महिलांसाठी दिलासा ठरत आहे. कमी खर्चात आकर्षक, हलके आणि आधुनिक डिझाइन उपलब्ध होत असल्याने या दागिन्यांची निपाणी सराफ बाजारात मागणी …

Read More »

शिरगुप्पी ओढ्यातील कचऱ्यामुळे पावसाळ्यात तलावात येणाऱ्या पाण्याला अडथळा

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील पाणी अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय सध्या पुरवठा होणाऱ्या पाण्यामधून गाळ येत आहे. अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत शिरगुप्पी ओढ्यातून दरवर्षी येणाऱ्या पाण्याच्या मार्गावर टाकाऊ वस्तु आणि झाडे झुडपे उगवली आहेत. पाऊस …

Read More »