Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे वतीने हुतात्मा दिन गांभिर्याने पाळण्याचे आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी संघटनेची बैठक पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, १ जून कन्नड शक्ती विरोधात धारातीर्थी पडलेल्या हुतात्माना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच कन्नड सक्तीवरुन जी दडपशाही …

Read More »

यडोगा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची पहिली बैठक उत्साहात

  खानापूर : खानापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे यडोगा येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या बैठकीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित युवकांनी व्यक्त केला. खानापूर तालुक्यातील विविध गावांतील युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मराठी समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे …

Read More »

निपाणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी

  निपाणी (वार्ता) : आगामी निपाणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय बैठक घ्यावी, असे आवाहन फोर- जे- आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. बैठकीतील माहिती अशी, निपाणी नगरपालिकेच्या इतिहासात आजपर्यंत निवडणुका शांततापूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आहेत. येणाऱ्या …

Read More »

पेरणी हंगामात खत-बियाण्यांच्या तुटवड्यावर शेतकरी आक्रमक; काळाबाजार रोखण्याची मागणी

  बेळगाव : पेरणीच्या तोंडावर बी-बियाणे आणि खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, युरियासह विविध खतांचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करत शेतकरी नेते प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी (एडीसी) यांना निवेदन सादर केले. निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, अनेक ठिकाणी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसून काही विक्रेते …

Read More »

संवाद कौशल्य, आधुनिक तांत्रिक शिक्षणावर युवकांनी भर द्यावा

  मीनाक्षी पाटील ;अरिहंत ग्रुपतर्फे रोजगार मेळावा निपाणी (वार्ता) : स्पर्धेच्या युगात युवकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे रोजगाराच्या संधींमध्येही बदल होत आहेत. त्यामुळे युवकांनी संगणक ज्ञान, संवाद कौशल्य आणि आधुनिक तांत्रिक शिक्षणावर भर दिल्यास भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ …

Read More »

डॉक्टरांच्या घरातील कोट्यवधींच्या दागिन्यांची चोरी उघड; केअरटेकर अटकेत

  बेळगाव : बेळगावातील एका नामांकित डॉक्टरांच्या घरातून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून फरार झालेल्या केअरटेकरला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चोरीचा माल विक्रीसाठी मदत करणाऱ्या आणखी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल सतीश कांबळे (वय २७, मूळ रा. कागवाड) असे असून, …

Read More »

पत्रकारितेच्या निष्ठेला मानवंदना, दिवंगत पत्रकार विठ्ठलराव पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन

  संकेश्वर (प्रतिनिधी) : समाजातील अन्याय, समस्या आणि सामान्य जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या पत्रकारांचे कार्य हे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांइतकेच महान आणि जबाबदारीपूर्ण आहे, असे गौरवोद्गार प्रकाश आवलक्की यांनी काढले. येथील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत विठ्ठलराव बाळू पाटील यांच्या ७ व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत …

Read More »

हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरीच्या तपासासाठी निपाणी पोलीस प्रशासनाला नागरिकांचे निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यातील साखर चोरीप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपास जलद गतीने होण्यासाठी माजी आम. प्रा. सुभाष जोशी, संचालक सुकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांना निवेदन देण्यात आले. याविषयी माहिती देताना माजी आमदार प्रा. जोशी म्हणाले, श्री. हालसिध्दनाथ …

Read More »

पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला धमकी देणारा युवक गजाआड

  बेळगाव : पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात साक्ष देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिरनवाडी येथील एका युवकाला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित विठ्ठल गणाचारी (वय 20, रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी, बेळगाव) असे असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या …

Read More »

शत्रूंचे मनसुबे उधळण्यासाठी हिंदू समाज एकवटण्याची गरज

  श्रीराम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक; निपाणीत हिंदू एकता सभा निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नाव नसून एक प्रचंड विचारशक्ती आहेत. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य आणि कुटुंबाचे सुख पणाला लावले. स्वातंत्र्यानंतरच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सावरकरांना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा विचार हा काल, आज आणि …

Read More »