Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

राममंदिर दानपेटी गैरव्यवहार प्रकरणावरून खानापूर काँग्रेसचा भाजप-आरएसएसवर सवाल

  खानापूर : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दानपेटीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खानापूर काँग्रेसने भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि संबंधित हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रसिद्धीपत्रकाद्वारे खानापूर काँग्रेसने विचारले आहे की, राममंदिर दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ खानापूरमध्ये भाजप, आरएसएस, बजरंग दल किंवा विश्व हिंदू परिषद …

Read More »

कै. वरद किरण पाटील यांच्या स्मरणार्थ डेंगू लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कपीलेश्वर चौक, बेळगाव यांच्या वतीने तसेच समाजसेवक कपिल भोसले यांच्या सहकार्याने कै. वरद किरण पाटील यांच्या स्मरणार्थ डेंगू लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष आकाश हुल्लीयार …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी; सामाजिक कार्यकर्ते शाम पाटील यांचे आवाहन

    बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी संबंधित घडलेल्या एका खेदजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व समाजप्रबोधनकर्ता शाम पाटील यांनी नागरिकांना महाराजांच्या प्रतिमेचा आणि विचारांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शाम पाटील यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून संपूर्ण …

Read More »

बेळगावात संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीचा समारोप; संघ विस्तार, सामाजिक उपक्रमांसह राममंदिर दानपेटी प्रकरणावरही चर्चा

  बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या वार्षिक बैठकीचा रविवारी बेळगाव येथे समारोप झाला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह देशभरातील २२६ वरिष्ठ पदाधिकारी या तीन दिवसीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत संघाच्या आगामी वर्षातील कार्याचा आराखडा, शाखा विस्तार, शताब्दी वर्षातील उपक्रम, प्रशिक्षण वर्ग आणि …

Read More »

दलित समाजाच्या विकासात पाटील कुटुंबीयांचे मोठे योगदान

  नगराध्यक्ष दिगंबर कांबळे :बोरगावमध्ये कुपनलिका खोदाईचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : दिवंगत सहकार रत्न रावसाहेब पाटील यांनी बोरगावच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कोणत्याही प्रकारचे जात-पात न करता शाश्वत विकास कामे राबविली. दलित समाजाच्या गल्ली बोळात रस्ते डांबरीकरण, गटार, विज, पाणी, पेव्हर ब्लॉक, शुद्ध पाणी घटक अशी विकास …

Read More »

खानापूरच्या युवकाची नेपाळमध्ये हत्या; रूम पार्टनरवर संशय, आरोपीचा शोध सुरू

  खानापूर : खानापूर शहरातील मुस्लिम निंगापूर गल्ली येथील रहिवासी साहिल रियाजअहमद मोमीन (वय २५) यांची नेपाळमध्ये चाकूने वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१० जुलै) पहाटे घडली. या घटनेमुळे खानापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात साहिलचा रूम पार्टनर सद्दाम …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे हिंदू रुद्रभूमीत पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

    बसवन कुडचीतील मोक्षधामात समाजोपयोगी प्रकल्प शाश्वत सेवा उपक्रमाला विविध संस्थांचे सहकार्य बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने केएलई व्ही. के. इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसच्या एनएसएस विभाग आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगाव उदान यांच्या सहकार्याने बसवन कुडची येथील हिंदू रुद्रभूमी (मोक्षधाम) येथे पाण्याच्या टाकीची उभारणी करून ती लोकार्पित …

Read More »

येळ्ळूरमध्ये समाज सारथी संघटनेचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

    येळ्ळूर : येथील समाज सारथी सेवा संघटनेच्या वतीने रविवारी (दि. १२) रोजी नेताजी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. संघटनेचे अध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी संघटनेचे सदस्य …

Read More »

मुसळधार पावसाऐवजी पावसाच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान; पाहणीनंतर मदतीचा निर्णय : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : पावसाच्या कमतरतेमुळे राज्यातील काही भागांत पिकांचे नुकसान झाल्याची माहिती असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामा व पाहणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत व आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. चिक्कोडी येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील इतर भागांच्या …

Read More »

पावसाच्या उसंतीने शेतात लगबग; कोळपणी-भांगलणीच्या कामांना वेग

      बेळगाव : परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कोळपणी व भांगलणीच्या कामांना वेग दिला आहे. भातासह विविध पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली ही कामे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असून शेतांमध्ये पुन्हा एकदा लगबगीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी शेतकरी मशागत, शेणखताचा …

Read More »