निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी फोर जेआर ह्युमन राईट्स मानव अधिकार संघटनेतर्फे बुधवारपासून (ता.१५) तहसीलदार कार्यालया समोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येणार आहे. हा लढा कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनेचा नाही. हा लढा निपाणी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हक्कांचा, मूलभूत गरजांचा आणि न्यायाच्या अपेक्षांचा लढा आहे. अनेक …
Read More »शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचा दोशी विद्यालयात सत्कार
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापिका व मार्गदर्शक शिक्षकांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्या हस्ते मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी मधील पात्र ठरलेल्या २ व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आठवी मध्ये …
Read More »भारत विकास परिषदेचा स्थापना दिवस अपूर्व उत्साहात
राष्ट्रीय संगठन मंत्री सुरेश जैन यांची उपस्थिती बेळगाव : भारत विकास परिषद बेळगाव शाखेच्यावतीने परिषदेचा ६४ वा स्थापना दिवस अत्यंत उत्साहात व प्रतिष्ठेने जीजीसी सभागृहात शुक्रवारी सायंकाळी साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दिल्लीहून भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुरेश जैन उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून ज्येष्ठ …
Read More »बोरगांवच्या दूधगंगा नदीवरील बंधाऱ्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील दूधगंगा नदीवर कायमस्वरूपी बंधारा उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश मालगावे, रयत संघटनेचे आदिनाथ …
Read More »राज्यात ऑक्टोबर अखेर ग्राम, तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका प्रक्रिया सुरू; पिण्याच्या पाण्यासाठी ११७ कोटींची तरतूद
बंगळूर : राज्यातील ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका ऑक्टोबरअखेरपर्यंत घेण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री ईश्वर खांड्रे यांनी केली. मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली असून, नियोजित वेळेत निवडणुका पार पाडण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बंगळुरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना …
Read More »शिधापत्रिकेतील त्रुटी दुरुस्तीसाठी विशेष मोहीम; बीपीएल लाभार्थ्यांना मोठा दिलासा
बेळगाव : पात्रता असूनही विविध कारणांमुळे बीपीएल शिधापत्रिका रद्द झालेल्या हजारो लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाने शिधापत्रिकेतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत ग्राम वन, कर्नाटक वन तसेच बेळगाव वन केंद्रांवर अर्ज स्वीकारले जाणार असून पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत …
Read More »देसूर एससी स्मशानभूमीसाठी बोअरवेलचे भूमिपूजन; पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार
बेळगाव : देसूर येथील अनुसूचित जाती (एससी) स्मशानभूमीतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांतून बोअरवेलला मंजुरी मिळाली आहे. या बोअरवेलच्या कामाचा शुभारंभ आज विधिवत पूजा करून करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मशानभूमीत पाण्याची दीर्घकाळ भेडसावत …
Read More »आंदोलनाच्या इशाऱ्याला यश; येळ्ळूर रोडवरील सर्व अधिकृत थांब्यांवर थांबणार बस!
शेतकरी महिलांच्या संतापाची प्रशासनाने घेतली दखल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी बेळगाव : येळ्ळूर मार्गावरील अधिकृत बसथांब्यांवर कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसेस न थांबविल्याने संतप्त झालेल्या शेतकरी महिला आणि ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला अखेर यश आले आहे. परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी येळ्ळूर मार्गावरील बसथांब्यांची प्रत्यक्ष पाहणी करून उद्यापासून सर्व अधिकृत …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, पत्रकार संघाच्या पुढाकारातून सीमा प्रश्नासंदर्भात राबविण्यात आलेल्या एक लाख सह्यांच्या मोहिमेतील …
Read More »सीमाप्रश्नी निर्णायक लढाईची नांदी; सर्वोच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी महाराष्ट्र सरकार करणार अर्ज
बेळगाव : सीमाप्रश्नाला निर्णायक वळण देण्याच्या दिशेने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाची तातडीने आणि सलग सुनावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने अधिकृत अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती समितीचे मध्यवर्ती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta