Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

सदलगा अर्बनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ पाटील यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : सदलगा येथील सदलगा अर्बन सौहार्द सहकारी संस्थेच्या संचालकपदी बोरगाव येथील सिद्धार्थ पाटील-टोणे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बी. के. वठारे, अभयकुमार मगदूम, राजू पाटील, मनोज पाटील, अभय करोले, जंबो मोळवाडे, अशोक पाटील, बाळासाहेब …

Read More »

शेड गळके, नातेवाईकांची फरफट!

  मारुती मंदिराजवळील स्मशानभूमी बनली गैरसोयीची; पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणेही कठीण निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्मशान मारुती स्मशानभूमीत मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहेत. नवीन बांधलेल्या स्मशानभूमीचे हस्तांतरण केल्याने पावसाळ्यात जुन्या स्मशान शेडमध्ये अंत्यसंस्कार करणेही कठीण झाले आहे. शेडमधून गळती होत असून अनेक गैरसोयींमुळे मृतदेह …

Read More »

खानापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे भरीव निधीची मागणी; आमदार विठ्ठल हलगेकर यांचे निवेदन

  बेळगाव : खानापूर तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी आणि विविध मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्री डी. के.. शिवकुमार यांच्याकडे केली आहे. गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या डी. के. शिवकुमार यांची आमदार हलगेकर यांनी भेट घेऊन खानापूर तालुक्यातील विविध विकासकामांबाबत सविस्तर …

Read More »

शेतकरी कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! लग्नासाठी सवलतीच्या दरात एसटी बस; अवैध प्रवासी वाहतुकीवर लगाम

  मुंबई : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभ व इतर शुभकार्यांसाठी प्रवाशांच्या वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाकडून मोठा दिलासा देणारी योजना लवकरच सुरू होणार आहे. नवीन एसटी बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर शेतकरी कुटुंबांना सवलतीच्या दरात एसटी बस थेट त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा विचार आहे. ग्रामीण भागात …

Read More »

राकसकोपला आठ दिवसांत १२ फूट पाणीसाठा; बेळगावकरांना तात्पुरता दिलासा

  जलाशय पूर्ण भरण्यासाठी अजून १७ फूट पाण्याची गरज   बेळगाव : शहरावर ओढावलेल्या भीषण पाणीटंचाईच्या संकटादरम्यान १ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात तब्बल १२ फूट पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. त्यामुळे बेळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही सुमारे १७ फूट …

Read More »

काँग्रेस रोडवरील नाला तुंबल्याने पूरस्थितीचा धोका; तक्रार करूनही प्रशासनाकडून कारवाई नाही

  बेळगाव : काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिरासमोरील उड्डाणपुलाखाली असलेल्या नाल्याच्या बोगद्याच्या प्रवेशद्वारात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा अडकून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बाधित झाला आहे. याबाबत सकाळी 8.00 वाजता संबंधित प्रशासनाला माहिती देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे हा अडथळा तातडीने …

Read More »

खानापूर तालुका लेक्चरर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा; प्रा. पी. व्ही. कर्लेकर यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा!

  खानापूर : कर्नाटक राज्य लेक्चरर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका सरकारी व अनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाची एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण बैठक नुकतीच खानापूर येथे अत्यंत उत्साहात पार पडली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या बैठकीत अत्यंत उत्सुकतावर्धक, खेळीमेळीच्या आणि एकोप्याच्या वातावरणात असोसिएशनच्या आगामी वर्षाच्या नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड …

Read More »

पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक मतदारसंघाला १ कोटी; सिंचन, क्लाऊड सीडिंगसह अनेक महत्त्वाचे निर्णय

बेळगाव : सुवर्णसौध येथे झालेल्या बेळगाव विभागीय प्रगती आढावा बैठकीत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून प्रत्येक ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. या निधीचा वापर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या निराकरणासाठी करावा, असे निर्देश त्यांनी दिले. राज्यात …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची 11 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक

  बेळगाव : सीमाप्रश्नी पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. 11 जुलै 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बुधवार, दि. 8 जुलै रोजी पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा …

Read More »

आठ दिवसांच्या पावसानंतर बेळगावला दिलासा!

  शहरात पुन्हा वर्दळ; धोकादायक झाडांचा प्रश्न मात्र कायम बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने बेळगाव शहर व परिसराला अक्षरशः झोडपून काढले होते. मात्र बुधवारी पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पुन्हा सुरळीत होऊ लागले. बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पुन्हा वर्दळ दिसू लागली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास …

Read More »