Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

मनसेकडून सीमावासीयांच्या जखमेवर मीठ; कन्नड रक्षक वेदिकेसोबत हातमिळवणी

  बेंगळुरू/मुंबई : हिंदी भाषेच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि भारतीय प्रादेशिक भाषांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि कन्नड रक्षक वेदिके या दोन संघटना एकत्र आल्या आहेत. कर्नाटकात झालेल्या बैठकीत दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय भाषांच्या हक्कांसाठी संयुक्तपणे लढण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी ‘इंडियन लँग्वेजेस फोरम’ स्थापन करण्यासह १० कलमी ‘कॉमन …

Read More »

खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीची आढावा बैठक

  खानापूर : तालुका पंचहमी गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीची आढावा बैठक अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनांची माहिती घेऊन सदस्यांनी विविध समस्या व प्रलंबित कामांबाबत सूचना केल्या. गृहलक्ष्मी योजनेबाबत माहिती देताना खानापूर तालुक्याचे सीडीपीओ विक्रम के. बी. व …

Read More »

बेळगावजवळील मुल्ला धाब्यावर जेवण करून परतताना भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

  धारवाड : चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे धारवाड तालुक्यातील वेंकटपूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडला. मृतांची नावे दावणगेरे जिल्ह्यातील केरेयागळ गावातील विनायक (२५), मंजुनाथ (२९) आणि बसवराज (३४) अशी आहेत. मिळालेल्या …

Read More »

बंगळुरमधून ३१ बांगलादेशी नागरिकांना हद्दपारीसाठी मालदाकडे रवाना

  बंगळूर : शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या ३१ बांगलादेशी नागरिकांना हद्दपारीच्या प्रक्रियेसाठी पश्चिम बंगालमधील मालदा येथे रवाना करण्यात आले आहे. बंगळुरातील विविध १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ताब्यात घेण्यात आलेल्या या नागरिकांना सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल रेल्वे स्थानकावरून कडक पोलीस बंदोबस्तात रेल्वेने पाठविण्यात आले. प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी …

Read More »

नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या राज्यातील १३ नागरिकांचा अद्याप संपर्क नाही : मुख्यमंत्री शिवकुमार

  ‘भू-हमी’संपूर्ण राज्यातील भूमालकांसाठी लागू बंगळूर : नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या राज्यातील १३ नागरिकांचा अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी केंद्राच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला असून, राज्य सरकारच्या वतीने प्रतिनिधींनाही पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. …

Read More »

“बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग” ठराव करण्याचा सरकारचा महापालिकेला आदेश!

  उद्या पत्रकार परिषदेत होणार खुलासा बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या कन्नड संघटनांना अखेर यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्य सरकारने महापालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केल्याचे बेळगावातील कन्नड संघटनांच्या महासंघाने म्हटले आहे. …

Read More »

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक रात्री अपरात्री; नागरिक झोपेत अन् पाणी गटारीत

    निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा विभागाकडून रात्री उशिरा किंवा अपरात्री पाणीपुरवठा सुरू केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दिवसभर कष्ट करून थकलेल्या नागरिकांना पाणी भरण्यासाठी रात्री जागवत ठेवण्यामागील कारण काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रात्री नागरिक झोपेत असल्याने पुरवठा करण्यात …

Read More »

निट्टूर मराठी शाळेत स्वयंपाक खोली व वर्गखोल्यांविना विद्यार्थ्यांचे हाल, एसडीएमसीची तालुका पंचायतीकडे धाव

  EO कडून सकारात्मक आश्वासन निट्टूर : सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, निट्टूर येथे गेल्या २ ते ३ वर्षांपासून स्वयंपाक खोली (किचन शेड) व सुरक्षित वर्गखोल्या नाहीत. याबाबत ग्रामपंचायत निट्टूर यांना वारंवार लेखी निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर तालुका पंचायत खानापूरचे कार्यनिर्वाहक अधिकारी (EO) श्री. रमेश …

Read More »

सर्वर डाऊन अन् वीज खंडितमुळे रेशन वितरण रखडले; जिल्ह्यात लाखो नागरिक धान्यापासून वंचित

  बेळगाव : रेशन वितरण प्रक्रियेमध्ये सर्वर डाऊनची समस्या जैसे थे असून, परिणामी जिल्ह्यात अद्यापही केवळ ८४.३६ टक्केच रेशन धान्याचे वितरण झाले आहे. ऑगस्ट महिना संपला तरीही मागील महिन्याचे रेशन वितरण सुरूच असून, जिल्ह्याभरातील तब्बल १ लाख ७७ हजार ७८० रेशनकार्ड धारक अद्यापही धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व …

Read More »

गृहज्योती लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुनर्पडताळणीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली

    बेळगाव (वार्ता) : ‘गृहज्योती’ योजनेच्या लाभार्थ्यांच्या पुनर्पडताळणीसाठी राज्य सरकारने आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी निश्चित करण्यात आलेली मुदत सोमवारी संपली होती. मात्र, पुनर्पडताळणीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला. राज्यातील विविध वीज वितरण कंपन्यांच्या कार्यक्षेत्रात अद्याप सुमारे ३० टक्के पुनर्पडताळणीचे काम बाकी असल्याने …

Read More »