खानापूर : राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेले मोहिशेत हे गाव आजही मूलभूत रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. 1994 पासून ग्रामपंचायत कार्यालय अस्तित्वात असूनही या गावाच्या रस्त्याकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम असून सध्या संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे आणि …
Read More »पहिल्याच मुसळधार पावसात बेळगाव जलमय!
शिवाजीनगर, पंजी बाबा, किल्ला तलाव परिसरात पाणी तुंबले; ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा, घरांमध्येही पाणी शिरले बेळगाव : पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे दावे करणाऱ्या महानगरपालिकेची पहिल्याच मुसळधार पावसाने पोलखोल केली. शहरातील सर्वात गंभीर ठरलेली ड्रेनेज समस्या पुन्हा एकदा उफाळून आली असून, शिवाजीनगर–पंजी बाबा आणि किल्ला तलाव परिसर जलमय झाला. जलवाहिन्या, गटारी आणि ड्रेनेजमध्ये …
Read More »बेलेवाडी काळम्माचा हरित संकल्प गायरान ते हिरवेगार स्वप्न; राणेवाडी मार्गाच्या दुतर्फासह गायरानवर वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : वाढत्या तापमानाने, अनियमित पावसाने आणि झपाट्याने कमी होत चाललेल्या हरित क्षेत्राने जगासमोर गंभीर पर्यावरणीय संकट उभे केले आहे. अशा परिस्थितीत बेलेवाडी काळम्मा ग्रामस्थांनी कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे. गावातील रानेवाडी रस्त्याकडील गायरान जमिनीवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून “हरित गाव, समृद्ध गाव” या संकल्पनेला …
Read More »तीव्र विरोधापुढे टाटा पॉवरची माघार; कर्नाटकातील वीज वितरणाच्या खाजगीकरणाला ब्रेक
बेळगाव : कर्नाटकातील वीज वितरण व्यवस्थेच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला राज्यभरातून झालेल्या तीव्र विरोधामुळे अखेर टाटा पॉवर कंपनीला माघार घ्यावी लागली आहे. कर्नाटक वीज नियामक आयोग (केईआरसी) यांनी प्रस्तावावर आक्षेप नोंदविल्यानंतर कंपनीने वीज वितरणाचे कंत्राट मिळविण्याचा प्रस्ताव मागे घेतला. या निर्णयामुळे हेसकॉमसह राज्यातील सर्व वीज वितरण कंपन्यांतील अधिकारी, कर्मचारी आणि संघटनांमध्ये …
Read More »हिटणी येथील सरकारी मराठी शाळेतील शिक्षकांच्या बदलीची मागणी; अन्यथा ३ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील हिटणी येथील सरकारी प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता, शिक्षकांची कथित बेजबाबदार वर्तणूक आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत एका ग्रामस्थाने गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. शाळेतील सर्व शिक्षकांची बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यनिष्ठ शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा ३ …
Read More »अर्जुननगर मधील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत यशाचा डंका
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 2025-26च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जान्हवी वडगुले हिने राज्यात सहावा तर तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी)मध्ये तब्बल 21 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र …
Read More »छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकासासाठी श्रीराम सेना आणि कर्नाटक क्षत्रिय मराठा समाजाची संयुक्त भूमिका
केकेएमपी महिला अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्याशी मुतालिक यांची सुदीर्घ चर्चा ! बेळगाव : श्रीराम सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केकेएमपी महिला अध्यक्षा तथा मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान होदगीरे (औदगीर) येथील स्वराज्याचे मूळ पुरुष छत्रपती …
Read More »पाण्याचे पाणी, चारा, आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या : मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निर्देश
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक बेळगाव : जिल्ह्यात पावसाची कमतरता जाणवत असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भासू नये यासाठी सर्व आवश्यक पूर्वतयारी तातडीने करावी. गरज भासल्यास राखीव निधीचा वापर करून खासगी बोअरवेल आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रभारी मंत्री …
Read More »सीमाभागात “SIR” फॉर्म मराठीत उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला म. ए. समितीचे स्मरणपत्र
बेळगाव : सीमाभागातील विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेसाठी गणना (Enumeration) फॉर्म मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावेत, तसेच तोपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी करत मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; शिंगणापूरसह १९ बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पाणीपातळी झपाट्याने वाढली
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून, गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १९.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा, वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta