बेळगाव : टिळकवाडी येथील वीर सौध योगा केंद्राचा आठवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे उपस्थित होते. प्रारंभी धन्वंतरी फोटो पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. उषा दळवी यांच्या हस्ते अग्नी होत्र करण्यात आले. आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योग महत्वाचा आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य …
Read More »अंमली पदार्थामुळे कुटुंबासह समाज उध्वस्त पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती निपाणी (वार्ता) : अंमली पदार्थांचे व्यसन केवळ एका व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंब आणि समाजालाही उद्ध्वस्त करते.अमली पदार्थ आणि धूम्रपानामुळे बुद्धीही नष्ट होऊ शकते. क्षणिक सुखासाठी मौल्यवान जीवचा बळी देऊ नका. तरुण पिढी ही देशाची संपत्ती असून अंमली पदार्थांचे गुलाम होऊ नका. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन …
Read More »कोल्हापूर प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या १९ आणि २० जून २०२६ रोजी झालेल्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सीमा प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या मराठी भाषिक कार्यकर्त्यांना रोखण्यात आल्याच्या घटनेवरून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी …
Read More »कंत्राटदाराच्या कथित छळाला बळी पडला तरुण कामगार
हिंडाल्कोसमोर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला बेळगाव : बेळगावजवळील हिंडाल्को कंपनीत कार्यरत असलेल्या अवघ्या २४ वर्षीय शंकर तळवार या तरुण कामगाराने कंत्राटदाराच्या कथित छळाला आणि नोकरी टिकवण्यासाठी करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आयुष्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या तरुणाला पाच लाख रुपयांची मागणी …
Read More »बेळगावातील मराठी फलक सक्तीने हटवल्याप्रकरणी केंद्राची मोठी दखल; कर्नाटक गृह विभागाला योग्य कारवाईचे निर्देश
बेळगाव : अनगोळ येथे एका नव्याने सुरू झालेल्या हॉटेलसह बेळगावातील इतर मराठी व्यावसायिक आणि त्यांच्या आस्थापनांवरील मराठी फलकांना कन्नड संघटनांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याच्या घटनांची केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भाषिक अल्पसंख्याक आयुक्तालयाने कर्नाटक राज्याच्या गृह विभागाला या प्रकरणी तातडीने आणि …
Read More »महाराष्ट्रातून दोन टीएमसी पाणी मिळणे अशक्य
बेळगाव : महाराष्ट्रातही पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे तेथून दोन टीएमसी पाणी मिळणे सध्या तरी शक्य नसल्याची माहिती महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे. महाराष्ट्रातही पाणीटंचाईची समस्या भासत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी बेळगावला पाणी देण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. शिवाय यावर्षीच नव्हे तर यापूर्वीच्या वर्षातही राज्य …
Read More »आद्रा नक्षत्राने दिला दिलासा; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
बेळगाव : पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलेल्या बळीराजाला अखेर आद्रा नक्षत्राने तारले असून मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या आगमनामुळे रखडलेल्या शेतीकामांना आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यंदा रोहिणी आणि मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. दोन्ही नक्षत्रांनी हुलकावणी …
Read More »क्रॉस व्होटिंग करणाऱ्या भाजप आमदारांवर कारवाईची टांगती तलवार; निलंबन किंवा हकालपट्टीची शक्यता
बंगळूर : विधान परिषद निवडणुकीत झालेल्या कथित क्रॉस व्होटिंग प्रकरणी कर्नाटक भाजपमध्ये शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत मिळाले आहेत. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मंगळवारी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन संबंधित आमदारांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत …
Read More »मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मेव्हण्याच्या घरावर ईडीची धाड
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे मेव्हणे तथा बेळगावचे अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या मालमत्तांवर ईडीने बुधवारी सकाळी मोठी कारवाई करत एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले. बेळगाव, बंगळुरू, म्हैसूर आणि हासन जिल्ह्यातील आरसीकेरे येथील विविध ठिकाणी ईडीच्या पथकांनी धाडसत्र राबवून कागदपत्रांची तपासणी केली. मंजुनाथ यांच्याशी …
Read More »अखेर पश्चिम घाट ‘पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र’ घोषित होण्याच्या मार्गावर; केंद्र सरकार लवकरच अधिसूचना काढणार
मुंबई : तब्बल १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींवर आता केंद्र सरकारने हालचाल सुरू केली असून, पश्चिम घाटातील मोठा भूभाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील (Ecologically Sensitive Area) म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटातील संपूर्ण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta