बेळगाव: “प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव हे असतातच, दुःख कोणालाही चुकलेले नाही, पण त्यातही आनंदी जगण्याचे अनेक पर्याय आपल्याला शोधता येतात, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधा, भरपूर हसा, हसण्याने तणाव कमी होतातच पण त्याबरोबरच कमालीचे शारीरिक व मानसिक लाभ मिळतात” असे विचार डॉ. प्रकाश फडणीस यांनी बोलताना व्यक्त केले. जायंट्स ग्रुप …
Read More »धोनीला बेळगावला बोलवा; भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडेही विद्यार्थ्यांचे लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आगळीवेगळी मागणी
बेळगाव : शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना बेळगावला आमंत्रित करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी आगळीवेगळी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी विद्यार्थ्यांनी गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाने केलेल्या प्रभावी कार्याचे कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या …
Read More »डिजिटल क्रांतीमुळे वाचनाकडे दुर्लक्ष; नामदेवराव चौगुले
कुर्लीत ‘वाचन कट्टा’ उपक्रमाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : डिजिटल क्रांतीमुळे वाचनाकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि ज्ञानाची आवड निर्माण करून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी वाचन गरजेचे असल्याचे मत निपाणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले यांनी व्यक्त केले. एचजेसी चीफ फौंडेशन व …
Read More »अल्पवयीन दुचाकीस्वाराला निपाणी पोलीसाकडून २५ हजार रूपयांचा दंड
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात कार्यान्वित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन’ (एएनपीआर) कॅमेऱ्यांनी पहिल्याच मोठ्या कारवाईत आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे. मुरगूड रोडवरील ए.आय कॅमेऱ्यात एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत असल्याचे स्पष्टपणे कैद झाले. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात …
Read More »कणबर्गी शासकीय हायस्कूलमध्ये मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन जनजागृती सत्र
बेळगाव : रोटरी क्लबच्या वतीने कणबर्गी येथील शासकीय हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (MHM) विषयावरील जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे ११० विद्यार्थिनींनी लाभ घेतला. सत्रामध्ये मासिक पाळीदरम्यान आवश्यक स्वच्छता, संतुलित आहार, वैयक्तिक आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींमधील गैरसमज दूर करून …
Read More »शाळा क्र. १९च्या प्रभारी मुख्याध्यापिका सविता चंदगडकर-निकम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञतेचा अविस्मरणीय सोहळा
बेळगाव : काळाच्या ओघात अनेक चेहरे येतात आणि निघून जातात. मात्र काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्याचा असा अमिट ठसा उमटवून जातात की, त्यांची ओळख केवळ एका पदापुरती मर्यादित राहत नाही, तर ती अनेक पिढ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत, संस्कारांची बीजे रुजवत आणि शिक्षणाला माणुसकीची …
Read More »‘एसआयआर’ फॉर्म कन्नडसोबत मराठीतही उपलब्ध करून द्या; सकल मराठा समाज नेते किरण जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : भारत सरकार आणि निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या देशभरात राबविल्या जाणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक मतदारांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी, सोमवार दिनांक ६ जुलै रोजी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान …
Read More »अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : ३८ दोषींची फाशी कायम; गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय
अहमदाबाद : २००८ मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय देत ३८ दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच ११ दोषींची जन्मठेपेची शिक्षाही कायम ठेवण्यात आली. विशेष न्यायालयाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद शहरात अवघ्या ७० मिनिटांत एकापाठोपाठ …
Read More »निपाणी जवळील तवंदी घाटातील अपघातात दोन जण जागीच ठार
निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटाच्या उतारावर वेगाने येणाऱ्या ट्रकची कारला जोराची धडक बसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात कोल्हापूर येथील दोन मेडिकल रिप्रेजेंटिव्ह (वैद्यकीय प्रतिनिधी) जागीच ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता.६) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची भीषणता …
Read More »खानापूरात पावसाचा कहर; बेळगाव जिल्हा अक्षरशः जलमय!
सहा दिवसांत विक्रमी २६४.२ मिमी पाऊस; नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले बेळगाव : बेळगाव जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः धडक दिली असून गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः खानापूर तालुक्यावर पावसाचा सर्वाधिक मारा झाला असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta