बेळगाव : मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तेल आणि वायूच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. याचा साहजिकच लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबल्याने लोक आधीच चिंतेत होते. आता तेलाचा पुरवठाही थांबणार असल्याच्या अफवा पसरल्याने, सोमवारी रात्री बेळगाव शहरातील बहुतेक पेट्रोल पंपांवर लोकांनी गर्दी केली. ते पेट्रोल आणि डिझेल …
Read More »शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास अन्न व्यवस्था धोक्यात
रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार; निपाणीतील बैठकीत सरकारला इशारा निपाणी (वार्ता) : गॅस व इंधनाची टंचाई भासल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पण भविष्यात अन्नदाता शेतकरीच संपावर गेला तर भयंकर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सर्वत्र आहाकार माजेल, असा इशारा कर्नाटक …
Read More »मृत्यु पूर्व जबानीतील तफावतीमुळे खून प्रकरणातील पाच जण निर्दोष
बेळगाव : येथील सहावे जिल्हा व सत्र न्यायालयाने खून प्रकरणातील पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश ओ. शिवपुत्र दिंडलकोप यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देताना पुराव्यांतील व विशेषतः मृत्यु पूर्व जबानीतील तफावतीचा आधार घेत निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपी जी. मंजु बाळराव देसाई (प्रभुनगर, खानापूर), अमोल परशराम परती, सुरज …
Read More »जय जनकल्याण सौहार्दतर्फे मण्णूरमध्ये ‘शवरथ वाहन’ लोकार्पण
बेळगाव : मण्णूर (ता जि. बेळगाव) येथील जय जनकल्याण सौहार्द संघातर्फे सामाजिक बांधिलकीतून मण्णूर गावांसाठी ‘शवरथ वाहन’ (शववाहिका) प्रदान कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. मण्णूर गावची स्मशानभूमी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. याखेरीज आजकाल अंत्यसंस्कारासाठी बहुतांशजण आपल्या वाहनांनी स्मशानभूमी पोहोचणे पसंत करतात. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्यांसह तिगडीवरून प्रेत नेताना …
Read More »जूनपासून १० हजार अंगणवाडी केंद्रात एलकेजी-यूकेजी वर्ग
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर; कार्यकर्त्यांच्या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने तोडगा बंगळूर : राज्यातील दहा हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये येत्या जून महिन्यापासून एलकेजी व यूकेजी वर्ग सुरू करण्यात येणार असून, अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या विविध मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने …
Read More »शहरी भागात दर २५ दिवसांत, ग्रामीण भागात ४० दिवसांनी सिलेंडरचा पुरवठा
व्यावसायिक वापरकर्त्यांना गेल नोंदणी अनिवार्य: राज्य सरकार बंगळूर : राज्यात निर्माण झालेल्या तीव्र एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरकर्त्यांनी आपल्या नेहमीच्या वापराच्या केवळ २० टक्के गॅसमध्येच कामकाज चालवावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनीयप्पा यांनी सोमवारी दिले. गॅस सिलेंडरच्या प्रश्नासंदर्भात आज अन्न विभागाच्या कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »पावसाळ्यापूर्वीच मांगुर फाट्यावरील पिल्लर उभारणी
पश्चिमेकडून वाहतूकीचा मार्ग मोकळा : वेदगंगा नदीकाठाला यंदा दिलासा निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. मांगुर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पुल हा सीमाभागातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या लढ्यामुळे भरावाऐवजी पिल्लरचा होत आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाची साथ मिळाल्यास येत्या पावसाळ्यापूर्वी पश्चिमेकडील बाजूची पिल्लर उभारणीचे …
Read More »जागतिक वन दिनानिमित्त यरनाळमध्ये भूमी वात्सल्य फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : जागतिक वन दिनानिमित्त भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनतर्फे यरनाळ येथील गायरान परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भारतीय वंशाच्या विविध वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली करण्यात आली. सुरेश घाटगे यांनी स्वागत करून पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट केले. या उपक्रमांतर्गत वड, पिंपळ, महोगणी, उंबर, करंजी …
Read More »येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली दीपक दळवी साहेबांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंबीर नेतृत्व आणि सीमा लढ्यातील झुंजार व्यक्तिमत्व दीपक दळवी साहेब यांच्या निधनामुळे सीमाभागावर शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगात दळवी कुटुंबाला आधार देण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेण्यात आली. या प्रसंगी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवंगत दीपक दळवी …
Read More »२०२१ मोर्चा खटल्याची तारीख २४ मार्च रोजी; खटल्यातील कार्यकर्त्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी कागदपत्रांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा पोलिसी बळावर धर्मवीर संभाजी महाराज चौकात अडविण्यात आला. यावेळी समिती व कार्यकर्त्यांनी चौकातच धरणे धरले तसेच आपल्या मागण्यांवर ठाम राहून घोषणाबाजी केली. या मोर्चावर पोलिसांनी कोरोना काळाचे निमित्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta